आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजीराजे नाईक

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे लहानपणापासूनच […]

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच’ ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे […]

माणसे घडविणारे चालते-बोलते विद्यापीठः संत भगवानबाबा

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे २९ जुलै १८९६ रोजी भगवानबाबांचा जन्म झाला. विसाव्या शतकातील होऊन गेलेले एक महान संत म्हणून संत भगवानबाबा यांना ओळखले जाते. अशा या भगवानबाबांची राहणी अत्यंत साधी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी आयुष्यभर अंधश्रध्दा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याचे महत कार्य केले. […]

आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज

श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांसारख्या थोर संतांचे चरित्र आपल्या लिखाणातून जनमानसांपर्यंत पोहचविणारे संत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज. ते कवी तसेच कीर्तनकार देखील होते. ६ जानेवारी १८६८ रोजी उमरी (जि.नांदेड) येथे त्यांचा जन्म झाला. (काही ठिकाणी त्यांचा जन्म १८६७ साली अकोळनेर, अहमदनगर येथे झाल्याचा उल्लेख आढळतो.) लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते. तरुणपणी […]

दि.२ मे (वैशाख शु.२) रोजी होणाऱ्या शिवजयंतीविषयक…!

खरी ‘शिवजयंती’ कोणती? असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली सध्याचे अधिक प्रसिद्ध असे शिवचरित्रकार ग.भा.मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ […]

श्री रेणुकादेवी प्रकट दिन !

आज चैत्र कृष्ण पंचमी. आदिशक्ती अयोनीजा बालिका रूप घेऊन ईक्ष्वाकू वंशी रेणू (प्रसेनजीत) राजाच्या यज्ञकुंडातून प्रकटली तो आजचा दिवस. काही परंपरांमध्ये चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस रेणुकेचा प्रकट दिन मानला जातो; पण सौंदत्ती परंपरेत चैत्र तृतीया ही तिथी रेणुकेच्या मलप्रभा तीरावर स्नानाला जाणे आणि नंतर झालेल्या शिरच्छेदाची मानली जाते. परशुराम कवीकृत रेणुका माहात्म्य ग्रंथात (रामत्त्व […]

करवीरचा लोकोत्सव… श्री करवीरनिवासिनीचा रथोत्सव !

जोतिबा यात्रेचा दुसरा दिवस. परंपरेप्रमाणे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाईचा रथोत्सव. दरवर्षी या दिवशी दुपारनंतर स्वयंस्फूर्तीने महाद्वार रस्ता, गुजरी, भाऊसिंगजी रस्ता, भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीचा शेषशायी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (नूतन मराठी शाळा ते बिनखांबी गणेश मंदिर) ते महाद्वार रस्ता हा सगळा मार्ग आपोआपच बंद केला जातो. आधीच पॉलिश केलेला आणि […]

सर्व मल्हार भक्तांना मार्तंडभैरव अर्थात खंडेरायाच्या प्रकट दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

कल्पारंभी ब्रह्मदेव तपात आणि नारायण योगनिद्रेत निमग्न असताना ब्रह्मदेवाच्या कर्णमलातून मधू आणि कैटभ जन्माला आले. त्यांचा वध नारायणानी केला. त्या वेळी त्यांच्या रक्ताचे थेंब शेषाच्या मस्तकावर पडले. त्यातून दोन जीव जन्माला आले. त्या जीवानी ब्रह्माची उपासना केली. त्यानी मागितलं की, ‘आम्हाला शिवाच्या हातून मरण यावं पण शिवाचं रूप एरव्ही पेक्षा भिन्न असावं.’ शक्तीसंपन्न होऊन ते जीव दैत्य […]

आनंद सोहळा लग्नाचा… श्री रेणुका-जमदग्नींचा !

रेणुका माहात्म्य ग्रंथातल्या कथेत सर्व अध्ययन झाल्यावर भगवान शंकर परशुरामांना म्हणाले, ‘भार्गवा, तुला अजून काही जाणून घ्यायचे आहे का?’ तेव्हा परशुराम म्हणाले, ‘हे परमेश्वरा, मला असं काहीतरी सांगा जे सर्वांना अज्ञात आहे.’ तेव्हा शंकरांनी परशुरामांना विचारले, ‘तू तुझ्या आई-वडिलांना ओळखतोस का?’ तेव्हा हसून परशुराम म्हणाले, ‘हा काय प्रश्न आहे?’ काश्मीर देशाच्या ईक्ष्वाकू कुळातील प्रसेनजित अर्थात रेणू […]

ज्योतिर्लिंग यात्रा, जोतिबा डोंगर कोल्हापूर

देव जोतिबा कोट्यवधी भक्तांच्या भक्तीविश्वाचा अधिपती. या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदोल्हासाचा क्षण ! पाडव्याला उभी केलेली सासनकाठी कामदा एकादशीला डोंगरावर आणायची. देवाला प्रदक्षिणा घालून नेमलेल्या जागी उभी करायची. हस्त नक्षत्रावर नाथ केदार यमाई भेटीला निघतो, तेव्हा ही सासनकाठी मिरवत यमाईकडे जायचं. नाथाचा गुलाल होऊन तृप्त व्हायचं. हा यात्रेचा विधी पण यामागचा इतिहास […]