श्रीकृष्ण सरस्वती महाराज

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा जन्म माघ महिन्यातील वद्य पंचमीला कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. तसेच सांप्रदायिक श्रध्देनुसार स्वामींना दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. कोल्हापुरातील कुंभार आळीमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले असल्याकारणाने ते मुख्यतः ‘कुंभारस्वामी’ या नावाने ओळखले जात. श्रीकृष्ण सरस्वती हे १४-१५ वर्षांचे असताना यांना त्यांचे कुलदैवत श्री […]

संत नरहरी सोनार महाराज

संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते. नरहरीच्या पत्नीचे नाव […]

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. संत निवृ​त्तीनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृ​त्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना सहज उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) […]

संत रोहिदास

संत रोहिदास

महान हिंदू संत रोहिदास यांचा जन्म चर्मकार घराण्यात आई घुरबिनिया यांचे पोटी वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम असून ते चामड्याचे काम करीत होते. परंतु त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. […]

नरवीर तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स.१६२६ साली सातारा जिल्ह्यातील गोडवली येथे झाला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर उंबरठ येथील शेलारमामांच्या घरीच त्यांचे संगोपन झाले. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजी मालुसरे यांचा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग होता. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार […]

॥ तयाचा वेलू गेला गगनावरी…॥

कोल्हापुरातील नामांकित चित्रकार व छायाचित्रकार श्री. दत्तात्रय नामदेव ऊर्फ डी. एन. शिर्के व सौ. सरस्वतीबाई यांच्या संसारवेलीवर १२ जानेवारी १९४८ रोजी आणखी एक फूल उमलले-त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ठेवले सदाशिव. श्री. डी. एन. शिर्के यांनी १९४४ साली कोल्हापुरात महाद्वार रोडवर भाड्याच्या जागेत रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच त्यांनी स्वतःच्याच नावे पहिली […]

आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजीराजे नाईक

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे लहानपणापासूनच […]

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच’ ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे […]

माणसे घडविणारे चालते-बोलते विद्यापीठः संत भगवानबाबा

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे २९ जुलै १८९६ रोजी भगवानबाबांचा जन्म झाला. विसाव्या शतकातील होऊन गेलेले एक महान संत म्हणून संत भगवानबाबा यांना ओळखले जाते. अशा या भगवानबाबांची राहणी अत्यंत साधी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी आयुष्यभर अंधश्रध्दा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याचे महत कार्य केले. […]

आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज

श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांसारख्या थोर संतांचे चरित्र आपल्या लिखाणातून जनमानसांपर्यंत पोहचविणारे संत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज. ते कवी तसेच कीर्तनकार देखील होते. ६ जानेवारी १८६८ रोजी उमरी (जि.नांदेड) येथे त्यांचा जन्म झाला. (काही ठिकाणी त्यांचा जन्म १८६७ साली अकोळनेर, अहमदनगर येथे झाल्याचा उल्लेख आढळतो.) लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते. तरुणपणी […]