।। जोतिबाच्या नावानं चांगभलं ।।

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेले जोतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या जोतिबा देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनी संबोधले जाते. सुमारे १ हजार फूट उंचीवर शंखाकृती आकारात हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या या जोतिबाच्या डोंगराला वाडी-रत्नागिरी असेही म्हटले जाते. या मंदिरातील जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेली असून या चतुर्भुज मूर्तीच्या […]

श्री महावीर जयंती खुलासा

चैत्र शु.१३ या दिवशी श्री महावीर जयंती साजरी केली जाते. रविवार दि.२ एप्रिल २०२३ रोजी द्वादशी (शु.१२) असून या तिथीची समाप्ती सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी पहाटे ६.२४ वाजता आहे. ज्या ठिकाणी सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.२४ पूर्वी सूर्योदय होतो त्या ठिकाणी दि.३ एप्रिल रोजी द्वादशीची वृध्दी होते व मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ […]

‘श्रीरामनवमी’

(चैत्र शुध्द नवमी) हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुध्द नवमीस श्रीभगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून ओळखले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून आजचा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी ठिक १२.०० वाजता रामजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवशी साजरा होणारा हा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सव […]

‘नवचैतन्याचा गुढीपाडवा’

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा एक सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा करण्याची परंपरा आहे. हा पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी नवीन कामाचा अथवा कार्याचा शुभारंभ केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घराच्या प्रवेशद्वारी उंचावर […]

वैशाखातील शिवजयंतीच खरी

खरी शिवजयंती कोणती असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ पासून शिवजन्मतिथी […]

‘मराठी राजभाषा दिन’

मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार तसेच मराठी मनाचा मानबिंदु असलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रजांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला असून त्यांनी आपल्या विलक्षण लेखणीतून प्रतिभा कौशल्याच्या आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून विपुल साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला […]

इतिहासातील एक सोनेरी पान – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

भारताच्या आधुनिक इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महान कवी, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. आपल्या मातृभूमीवर निर्व्याज प्रेम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आजच्या काळात देखील भारतीयांना मार्गदर्शक ठरतात. जाज्वल्य देशभक्ती, प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक नेतृत्त्व, तत्त्वनिष्ठ हिंदुत्त्ववादी राजकारणी, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्त्व असणारे, धर्माभिमान व […]

जागतिक मुद्रण दिन

२४ फेब्रुवारी रोजी मुद्रण कलेतील जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा हा दिवस ‘जागतिक मुद्रण दिन’ म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम मुद्रण पद्धतीचा शोध हा चीनमध्ये लावला गेला. त्या काळात उपकरणाचे साधन म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा वापरली जात असे. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवला जात असे. […]

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे परीट घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंग्राजी व आईचे नाव सखुबाई असे होते. संत गाडगेबाबांना डेबूजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असून ते अंगावर नेहमी फाटकी […]

।। श्री रामकृष्ण परमहंस ।।

रामकृष्ण परमहंस यांचा जन्म बंगालमधील कामाटपूकर या गावी एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. त्यांच्या लहानपणीच वडील क्षुदिराम यांना गयेतील तीर्थयात्रेवेळी गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले होते म्हणून या बालकाचे नाव गदाधर असे ठेवण्यात आले. लहानपणी त्यांना गदा या नावाने ओळखले जात होते. वडिलांच्या निधनानंतर परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांचे थोरले बंधू […]